मराठीगजल ह्या संकेतस्थळावर घेतलेल्या गजल कार्यशाळेत लिहीलेली ही 'तरही' गजल
हुंदका साधा तुझा सांगून गेला
भावनांचा बांध तो फ़ोडून गेला
अंतरीचा ग्रीष्म इतका तप्त होता
चांदण्यांचा स्पर्शही जाळून गेला
आसवांचे पावसाळे, नित्य झाले
मेघ काळा काळजा व्यापून गेला
कवडसा छोटा परी माझ्या नभाला
सप्तरंगी झुंबरे टांगून गेला
बोलणे झालेच नाही पण अबोला
आपल्यामधला दुवा सांधून गेला
मी यशाची सर्व शिखरे चढत असता
पाय खाली सोयरा खेचून गेला
ढोंग मी केले सुखाचे तुज समोरी
चेहरा माझा मला फ़सवून गेला
मानली ना हार श्वासांनी कधी पण;
श्वास मॄत्यूचा मला हरवून गेला
Wednesday, February 20, 2008
Subscribe to:
Posts (Atom)