Friday, December 21, 2007

ऋतू येत होते ऋतू जात होते

मायबोलीवर वैभव जोशी ह्यांनी जी गजल कार्यशाळा आयोजित केली होती त्यात मी लिहिलेली ही गजल..


ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी तेच माधुर्य प्रेमात होते

नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो
किती लाघवी तीर भात्यात होते

मुकी राहुनी ही किती बोलली ती
उतरले तिच्या भाव डोळ्यात होते

अता सार्थकी लागला जन्म माझा
तिचे मखमली श्वास श्वासात होते

रुढींची वृथा का तमा बाळगू मी?
मला साथ द्याया तिचे हात होते

तिच्या पासुनी वेगळे मज करावे
कुठे एवढे धैर्य काळात होते?

2 comments:

अभिजीत दाते said...

Sundar gazal aahe .
Tumchi vidambane tar farmaasach asataat .
Asech lihit raha .

Abhijeet date

मिलिंद छत्रे said...

धन्यवाद अभिजित