मायबोलीवर वैभव जोशी ह्यांनी जी गजल कार्यशाळा आयोजित केली होती त्यात मी लिहिलेली ही गजल..
ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी तेच माधुर्य प्रेमात होते
नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो
किती लाघवी तीर भात्यात होते
मुकी राहुनी ही किती बोलली ती
उतरले तिच्या भाव डोळ्यात होते
अता सार्थकी लागला जन्म माझा
तिचे मखमली श्वास श्वासात होते
रुढींची वृथा का तमा बाळगू मी?
मला साथ द्याया तिचे हात होते
तिच्या पासुनी वेगळे मज करावे
कुठे एवढे धैर्य काळात होते?
Friday, December 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
 
 
 Posts
Posts
 
 

2 comments:
Sundar gazal aahe .
Tumchi vidambane tar farmaasach asataat .
Asech lihit raha .
Abhijeet date
धन्यवाद अभिजित
Post a Comment